Posts

Showing posts from December, 2018
Image
भारतीय जनता पक्षाचा मेगा डिस्काउंट सुरु? २०१४ ला भारतीय जनता पक्षाचे केंद्रात २८२ खासदार निवडून आले. एकदा इतके खासदार निवडून आल्यावर, ह्या आकड्याची आम्हाला खात्रीच होती इत्यादी दावे जरी त्या पक्षाच्या नेत्यांनी केले असले तरी त्यांना देखील ह्या आकड्याची खात्री नसणार हे नक्की. कारण आपण स्वतःच्या ताकदीवर २७५ चा आकडा गाठू शकतो ह्याची खात्री जर तेंव्हाच्या नेतृत्वाला, म्हणजे नरेंद्र मोदी ज्यांचं नाव पुढे करून भाजप निवडणूक लढवत होते त्या मोदींनी जवळपास देशातल्या निम्म्याहून राज्यात घटक पक्षांचं लोढणं अंगावर घेतलं नसतं. उत्तर प्रदेशात अपना दल सारखा अगदी छोटा पक्ष पण त्यांनी सामावून घेतला ह्यावरून जशी त्यांना खोटी सर्वसमावेशकता दाखवायची होती तसंच स्वबळावर येण्याचा कॉन्फिडन्स देखील नव्हता. १६ मे ला निकाल लागले, भारतीय जनता पक्षाचे २८२ खासदार निवडून आले आणि नरेंद्र मोदींचा नूर बदलला. भाजपच्या नेतृत्वाचा वारू चौफेर उधळला आणि एनडीएचं सरकार आलं असं जरी म्हणलं तरी ते भाजपचंच सरकार राहील ह्याची खबरदारी श्री. नरेंद्र मोदी आणि पुढे जाऊन श्री. अमित शाह ह्यांनी घेतली. एनडीएचे समनव्यक हे श्री. चं...
Image
राज ठाकरेंनी जर शिवसेना सोडलीच नसती तर...  १८ डिसेंबर २००५ ला म्हणजे बरोबर १३ वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी शिवसेना सोडली. पण जर त्यांनी शिवसेना सोडलीच नसती किंवा समजा सोडली असती आणि त्यांनी किमान सक्रिय राजकारणातून सन्यास घेतला असता तर काय घडले असते? तुम्हाला हा प्रश्न आत्याबाईंनी मिश्या असत्या तर काय झाले असते, असा वाटेल पण भविष्यवेधी गोष्टींचा विचार करताना आधी घडलेली गोष्ट घडली नसती तर काय झालं असतं ह्याचा विचार करून बघावाच लागतो. आणि हा विचार करताना, मुख्यतः राज ठाकरेंच्या शिवसेना सोडण्याबद्दल सामन्यांच्या मनातला मतप्रवाह काय आहे ह्याचा जर कानोसा घेतला तर दोन उत्तरं येतात १) बाळासाहेबांच्या नंतर शिवसैनिकांनीच त्यांचं नेतृत्व राज ठाकरेंकडे सोपवलं असतं २) सध्याची शिवसेनेची बिचारी अवस्था झाली नसती. हे झाले दोन विचार जे राज ठाकरेंच्या शिवसेना सोडण्याभोवती फिरत असतात. म्हणजे शिवसैनिक नसलेल्याना देखील असं वाटत राहतं की राज ठाकरेंच्या व्यक्तिमत्वात शिवसेना नावाचा अंगार पुढे नेण्याची ताकद होती. मराठ्यांचं साम्राज्य हे पार अफगाणिस्तान पर्यंत नेऊन टेकवणाऱ्या, आणि स्वातंत्र्य चळवळ...