Posts

Showing posts from December, 2020

समाजमाध्यमांच्या रणांगणात

Image
कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरेल, त्यावर लस येईल, त्या लसीचा प्रभाव दिसेल आणि कोरोना हा आजार आत्ता जितका प्राणघातक आहे तितका कदाचित राहणार नाही आणि शारीरिक आणि मानसिक बंधनात अडकलेला संपूर्ण मानव समूह मोकळा श्वास घेऊ लागेल, आणि त्यानंतरच जग अर्थात त्याला कोरोनात्तर जग म्हणायचं झालं तर ते पूर्णपणे वेगळं जग असेल. ते पूर्णपणे वेगळं असेल ह्याचा अर्थ दृश्य पातळीवरचं जग नाही पण, संपूर्ण जगाला वेढून टाकणारी भीती, अनिश्चितता, तुटलेपण, एकटेपण आणि परिस्थितीवश तंत्रज्ञानाच्या किंवा समाजमाध्यमांचा पूर्णपणे कह्यात गेलेलं आयुष्य ह्यात माणूस गुरफटून गेला आहे. अर्थात हे गुरफटणं हे काही आत्ताचं नाही तर गेलं एक आख्ख दशक ही प्रक्रिया सुरु आहे.  २१ व्या शतकातील दुसरं दशक संपायला आलं आहे. ह्या दशकाचा आढावा घ्यायचा असेल तर सोशल मीडिया आणि त्याच्याशी निगडित डिजिटल तंत्रज्ञाशी आपलं नातं एका शब्दात ठरवायचं ठरलं तर, आपली अवस्था 'धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय' अशी झाली आहे.  फेसबुक सारखं समाज माध्यम जन्माला येऊन १६ वर्ष पूर्ण झाली, ह्याच फेसबुकच्या जोरावर मध्यपूर्वेतील अनेक देशांमध्ये झालेली सत्तांतरं ज्या...

नवउद्यमी भारत चौथ्या औद्योगिक क्रांतीवर तरी स्वार होणार का?

Image
  नवउद्यमी भारत चौथ्या औद्योगिक क्रांतीवर तरी स्वार होणार का? कोरोनाचा कहर सुरु असताना पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी ह्यांनी 'आत्मनिर्भर भारत' ही घोषणा केली.  चीनच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाचा विषाणू जगभर पसरला आणि त्यामुळे युरोप आणि अमेरिका हे चीनला धडा शिकवतील, त्या देशांत आउटसोर्स केलेलं प्रकल्प भारतात येतील आणि डिजिटल आत्मनिर्भरतेचं पर्व आता सुरु होईल अशी स्वप्न भारतातील एका गटाला पडू लागल्या. हे कसं शक्य आहे ह्यावर भारतातला एक विशिष्ट मध्यमवर्ग आणि उच्चमध्यमवर्ग दिवाणखान्यात आणि अर्थात समाजमाध्यमांवर आपण कसे आत्मनिर्भर होणार ह्याच्या चर्चा रंगवू लागला.  सकारात्मक विचार म्हणून हे ठीक आहे. आपण आत्ता फक्त घोषणा केली आहे, अजून बराच लांबचा टप्पा गाठायचा आहे. आपल्या देशाची क्षमता निश्चित आहे पण ज्यांच्याशी स्पर्धा आहे त्यांची तयारी तर समजून घ्यावी लागेल, आपल्या उणिवा शोधाव्या लागतील आणि आत्तापर्यंत मिळालेल्या यशाचं विवेचन करावं लागेल.  तर भारतात अकरावं शतक ते ब्रिटिश राजवटीचा अंमल सुरु होईपर्यंतचा काळ म्हणजे अठराव्या शतकाचा काळ सुरु होईपर्यंतचा काळ हा मध्ययुग किंवा अंध...