Posts

Showing posts from May, 2022

जग भूकबळींच्या उंबरठ्यावर?

Image
 जग भूकबळींच्या उंबरठ्यावर? गेले काही दिवस पाश्चिमात्य माध्यमं एक भाकीत वर्तवत आहेत की जग भूकबळींच्या उंबरठ्यावर आहे आणि येत्या काही महिन्यात जगातील अनेक देशांमध्ये अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा असणार आहे. अर्थात अशा कोणत्याही घटनेला कोणालातरी जबाबदार धरणं हे जगभरातील राज्यकर्त्यांचा काम असतं. तसं ह्या वेळेस व्लादीमीर पुतीन ह्यांना जबाबदार धरलं आहे. अर्थात कारण म्हणजे पुतिननी युक्रेनवर लादलेलं युद्ध.  वॉशिंग्टन पोस्टचा अंदाज आहे की जगभरातील २१९ दशलक्ष लोकं ही अन्नधान्याच्या अनिश्चिचिततेच्या छायेत (food insecure) जगत आहेत. थोडक्यात आज जेवण मिळालं उद्याच काय ह्या विवंचनेत जगत आहेत.  अगदी आपल्या शेजारचं उदाहरण आहे श्रीलंकेचं. श्रीलंकेत अन्नधान्याचा अभूतपूर्व तुटवडा आहे. आणि अर्थात राजपक्षे राजवट जशी त्याला जबाबदार आहे तसंच पुतीननी युक्रेनवर लादलेलं युद्ध पण.  युक्रेन हा जगातील अनेक देशांचा अन्नदाता आहे. श्रीलंका, येमेन, सुदान, लेबेनॉन, युगांडा, टांझानिया, इजिप्त, ट्युनिशिया, कॅमेरॉन सारखे देश शब्दशः युक्रेनमधून आयात होणाऱ्या धान्यावर अवलंबून असणारे देश आहेत. पुतीननी ब्लॅक ...

ऋतू

Image
 'महाराष्ट्रात पुन्हा एकदा उष्णतेची लाट'... 'तापमानाचा पारा चढताच राहणार'......   अशा बातम्या वाचल्या तरी मनाची घालमेल सुरु होते. अस्वस्थ व्हायला होतं. त्यात पर्यावरणाचा ह्रास कसा होतोय आणि हे किती गंभीर होत जाणार ह्या बातम्यांना आणि सोशल मीडियावरच्या पोस्ट्सना ऊत येतो. आणि वाढत्या उकाड्यामुळे शरीराची जी घालमेल होते त्यापेक्षा अधिक ह्या बातम्यांनी मनाची घालमेल सुरु होते, अस्वस्थता, अनिश्चितता ह्याच्या भोवऱ्यात मन अडकत आणि त्यातून सुटका करून घ्यायला हात नकळत एसीच्या रिमोटकडे जातात. मनाला उन्हाळ्याचा दाह कमी झाल्यासारखा वाटतो. पण हा दाह कमी होतो म्हणजे नक्की काय कमी होत असेल?  काही कमी होत नाही... माझी ह्या रखरखीपासून तात्पुरती सुटका करून घेऊ शकतो, आणि पुढच्या ऋतूची वाट पाहू शकतो जो इतका त्रासदायक ठरणार नाही ह्याची खात्री बाळगत निवांत राहू शकतो इतकंच.    ह्यावरून एक प्रसंग आठवला. भर मे महिन्यात एकदा दिल्लीहुन मुंबईला येत होतो. एक मित्र सोडायला आला होता दिल्ली एअरपोर्टला. वाटेत म्हणाला एका ठिकाणी दहीवडे खाऊ. सकाळी दहा वाजता दहीवडे खाण्याची तयारी दिल्लीकरच दाखवू शकत...