Posts

कृपया ह्यांना माफ करा

Image
  सॅमसंग ह्या दक्षिण कोरियन उद्योगसमूहाचे अध्यक्ष ली जे यंग हे सध्या भ्रष्टाचार आणि लाच देणे ह्या आरोपांखाली जेल मध्ये शिक्षा भोगत आहेत. फोर्ब्सच्या जगातील सर्वाधिक शक्तिशाली लोकांच्या यादीतील हा मानकरी, पण त्याला सुद्धा शिक्षा होऊन जेलमध्ये जाण्याची वेळ येऊ शकते, हे वाचून दक्षिण कोरियात कायद्याची बूज कशी राखली जाते असं आपल्याला वाटू शकेल. पण तसं नाहीये. सॅमसंग समूहाच्या अध्यक्षाला जेलमध्ये रहावं लागतंय ह्याचं दुःख दक्षिण कोरियन उद्योग जगताला पण आहे आणि तिथल्या व्यवस्थेला पण. कारण सॅमसंगची अफाट आर्थिक ताकद.  जवळपास २००बिलियन डॉलर्सचा व्यवसाय करणाऱ्या सॅमसंग समूहात, जरी 'सॅमसंग टेलिकम्युनिकेशन', 'सॅमसंग मेडिसन' सारख्या काही कंपन्या असल्या तरी ह्या समूहाची मानांकित कंपनी म्हणजे 'सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स'. ८८ बिलियन डॉलर्सची गंगाजळी घेऊन बसलेली ही कंपनी दक्षिण कोरियन अर्थव्यवस्थेचा  कणा आहे.  देशातून होणाऱ्या एकूण निर्यातीपैकी जवळपास २५% निर्यात ही एकट्या सॅमसंगची असते.    जगातल्या कुठल्याही देशात असते तशीच स्थिती दक्षिण कोरियात पण आहे. काही मोजक्या अतिबलाढ्य उद्...

समाजमाध्यमांच्या रणांगणात

Image
कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरेल, त्यावर लस येईल, त्या लसीचा प्रभाव दिसेल आणि कोरोना हा आजार आत्ता जितका प्राणघातक आहे तितका कदाचित राहणार नाही आणि शारीरिक आणि मानसिक बंधनात अडकलेला संपूर्ण मानव समूह मोकळा श्वास घेऊ लागेल, आणि त्यानंतरच जग अर्थात त्याला कोरोनात्तर जग म्हणायचं झालं तर ते पूर्णपणे वेगळं जग असेल. ते पूर्णपणे वेगळं असेल ह्याचा अर्थ दृश्य पातळीवरचं जग नाही पण, संपूर्ण जगाला वेढून टाकणारी भीती, अनिश्चितता, तुटलेपण, एकटेपण आणि परिस्थितीवश तंत्रज्ञानाच्या किंवा समाजमाध्यमांचा पूर्णपणे कह्यात गेलेलं आयुष्य ह्यात माणूस गुरफटून गेला आहे. अर्थात हे गुरफटणं हे काही आत्ताचं नाही तर गेलं एक आख्ख दशक ही प्रक्रिया सुरु आहे.  २१ व्या शतकातील दुसरं दशक संपायला आलं आहे. ह्या दशकाचा आढावा घ्यायचा असेल तर सोशल मीडिया आणि त्याच्याशी निगडित डिजिटल तंत्रज्ञाशी आपलं नातं एका शब्दात ठरवायचं ठरलं तर, आपली अवस्था 'धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय' अशी झाली आहे.  फेसबुक सारखं समाज माध्यम जन्माला येऊन १६ वर्ष पूर्ण झाली, ह्याच फेसबुकच्या जोरावर मध्यपूर्वेतील अनेक देशांमध्ये झालेली सत्तांतरं ज्या...

नवउद्यमी भारत चौथ्या औद्योगिक क्रांतीवर तरी स्वार होणार का?

Image
  नवउद्यमी भारत चौथ्या औद्योगिक क्रांतीवर तरी स्वार होणार का? कोरोनाचा कहर सुरु असताना पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी ह्यांनी 'आत्मनिर्भर भारत' ही घोषणा केली.  चीनच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाचा विषाणू जगभर पसरला आणि त्यामुळे युरोप आणि अमेरिका हे चीनला धडा शिकवतील, त्या देशांत आउटसोर्स केलेलं प्रकल्प भारतात येतील आणि डिजिटल आत्मनिर्भरतेचं पर्व आता सुरु होईल अशी स्वप्न भारतातील एका गटाला पडू लागल्या. हे कसं शक्य आहे ह्यावर भारतातला एक विशिष्ट मध्यमवर्ग आणि उच्चमध्यमवर्ग दिवाणखान्यात आणि अर्थात समाजमाध्यमांवर आपण कसे आत्मनिर्भर होणार ह्याच्या चर्चा रंगवू लागला.  सकारात्मक विचार म्हणून हे ठीक आहे. आपण आत्ता फक्त घोषणा केली आहे, अजून बराच लांबचा टप्पा गाठायचा आहे. आपल्या देशाची क्षमता निश्चित आहे पण ज्यांच्याशी स्पर्धा आहे त्यांची तयारी तर समजून घ्यावी लागेल, आपल्या उणिवा शोधाव्या लागतील आणि आत्तापर्यंत मिळालेल्या यशाचं विवेचन करावं लागेल.  तर भारतात अकरावं शतक ते ब्रिटिश राजवटीचा अंमल सुरु होईपर्यंतचा काळ म्हणजे अठराव्या शतकाचा काळ सुरु होईपर्यंतचा काळ हा मध्ययुग किंवा अंध...

आपणच नियती ह्या थाटात वावरणाऱ्यांना पराभव पचवता येत नाही, त्यांच्यासाठी 'विन्स्टन चर्चिल' उतारा

Image
पराभव हा पचायला सगळ्यात कठीण पदार्थ. आणि पराभवानंतर देखील स्वतःची ग्रेस, मिश्कीलपणा जो कायम टिकवून ठेऊ शकतो तोच पुन्हा जेता होण्याची शक्यता असते. काल जे काही महाराष्ट्राच्या विधानसभेत घडलं त्यावर एक प्रसंग आठवला आणि ते लिहावंसं वाटलं. अर्थात आधीच डिस्क्लेमर टाकतो की सातत्याने 'बौद्धिकं आणि चिंतन शिबिरं' भरवणाऱ्या कुठल्याही वर्गाला कोणत्याही प्रकारे भान देण्याचा माझा कोणताही उद्देश नाही, तेवढी क्षमता देखील नाही. तर.... नेटफ्लिक्सवरच्या 'क्राऊन' ह्या सिरीयल मधल्या पहिल्यासिझनमधल्या एका एपिसोड मधला भाग. क्वीन एलिझाबेथ २ ह्यांचा विवाह सोहळ्याचा दिवस म्हणजेच २० नोव्हेंबर १९४७. तेंव्हाच्या ग्रेट ब्रिटन मध्ये सत्तांतर होऊन दोन वर्ष झाली आहेत. विन्स्टन चर्चिल ज्यांनी दुसरं महायुद्ध मित्र पक्षांना जिंकून दिलं आणि इतकंच नव्हे तर हिटलरच्या पाशवी हल्ल्यांनी गर्भगळीत झालेल्या ब्रिटनला ज्यांनी सावरलं ते दुसऱ्या महायुद्धानंतरच्या सार्वत्रिक निवडणुकात सपशेल पराभूत झाले होते आणि किमान विन्सटन चर्चिल ह्यांच्या तुलनेत फारच सुमार दर्जाचे वाटणारे क्लेमंट अॅटली हे देशाचे पंतप्रधान होते....

‘आदित्यपर्वात’ तरी शिवसेनेची ‘फ्रेंडलिस्ट’ वाढणार का?

Image
(हा लेख 'महापंच' ह्या वेबपोर्टलसाठी लिहिला आहे ) शिवसेनेची स्थापना १९६६ची. तेव्हापासून आजपर्यंत ह्या संघटनेची बांधणी आणि मिळवलेलं यश हे जितकं विस्मयकारक आहे तितकंच अनेकदा पराभव होऊन, प्रचंड टीका होऊन देखील शिवसेना हा पक्ष देशातील इतर राजकीय पक्षांसारखा एखाद्या निवडणुकीत एकदम रसातळाला गेलाय असं कधी झालं नाही. देशातील इतर प्रादेशिक पक्षांपेक्षा ह्या पक्षाला मिळालेलं यश हे काहीसं उशिरा मिळालं आणि इतर प्रादेशिक पक्षांसारखं त्यांना महाराष्ट्रात एकहाती सत्तेत येता आलं नसलं तरी शिवसेना नावाच्या फोर्सची यशाची भाजणी ही चढती आहे हे नाकारता येणार नाही. शिवसेनेने जे मिळवलं आणि टिकवलं ह्याचं कौतुक करताना शिवसेनेला जे मिळवता आलं नाही, त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही- १) शिवसेनेला स्वतःची वेगळी ओळख, ताकद आणि एक प्रचंड करिष्मा असलेला नेता प्रमुख म्हणून लाभला तरी त्याला इतर पक्षांसारखं दिल्लीत स्वतःचा जम बसवता आला नाही. २) त्यांना राजकीय लवचिकता आणता आली नाही. शिवसेना स्थापनेपासून संघटनाच राहिली, तिचा कधी पक्ष होऊ शकला नाही. जवळपास ५३ वर्ष एक विचार, संघटना म्हणून टिकवणं ही जरी कला अस...
Image
भारतीय जनता पक्षाचा मेगा डिस्काउंट सुरु? २०१४ ला भारतीय जनता पक्षाचे केंद्रात २८२ खासदार निवडून आले. एकदा इतके खासदार निवडून आल्यावर, ह्या आकड्याची आम्हाला खात्रीच होती इत्यादी दावे जरी त्या पक्षाच्या नेत्यांनी केले असले तरी त्यांना देखील ह्या आकड्याची खात्री नसणार हे नक्की. कारण आपण स्वतःच्या ताकदीवर २७५ चा आकडा गाठू शकतो ह्याची खात्री जर तेंव्हाच्या नेतृत्वाला, म्हणजे नरेंद्र मोदी ज्यांचं नाव पुढे करून भाजप निवडणूक लढवत होते त्या मोदींनी जवळपास देशातल्या निम्म्याहून राज्यात घटक पक्षांचं लोढणं अंगावर घेतलं नसतं. उत्तर प्रदेशात अपना दल सारखा अगदी छोटा पक्ष पण त्यांनी सामावून घेतला ह्यावरून जशी त्यांना खोटी सर्वसमावेशकता दाखवायची होती तसंच स्वबळावर येण्याचा कॉन्फिडन्स देखील नव्हता. १६ मे ला निकाल लागले, भारतीय जनता पक्षाचे २८२ खासदार निवडून आले आणि नरेंद्र मोदींचा नूर बदलला. भाजपच्या नेतृत्वाचा वारू चौफेर उधळला आणि एनडीएचं सरकार आलं असं जरी म्हणलं तरी ते भाजपचंच सरकार राहील ह्याची खबरदारी श्री. नरेंद्र मोदी आणि पुढे जाऊन श्री. अमित शाह ह्यांनी घेतली. एनडीएचे समनव्यक हे श्री. चं...
Image
राज ठाकरेंनी जर शिवसेना सोडलीच नसती तर...  १८ डिसेंबर २००५ ला म्हणजे बरोबर १३ वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी शिवसेना सोडली. पण जर त्यांनी शिवसेना सोडलीच नसती किंवा समजा सोडली असती आणि त्यांनी किमान सक्रिय राजकारणातून सन्यास घेतला असता तर काय घडले असते? तुम्हाला हा प्रश्न आत्याबाईंनी मिश्या असत्या तर काय झाले असते, असा वाटेल पण भविष्यवेधी गोष्टींचा विचार करताना आधी घडलेली गोष्ट घडली नसती तर काय झालं असतं ह्याचा विचार करून बघावाच लागतो. आणि हा विचार करताना, मुख्यतः राज ठाकरेंच्या शिवसेना सोडण्याबद्दल सामन्यांच्या मनातला मतप्रवाह काय आहे ह्याचा जर कानोसा घेतला तर दोन उत्तरं येतात १) बाळासाहेबांच्या नंतर शिवसैनिकांनीच त्यांचं नेतृत्व राज ठाकरेंकडे सोपवलं असतं २) सध्याची शिवसेनेची बिचारी अवस्था झाली नसती. हे झाले दोन विचार जे राज ठाकरेंच्या शिवसेना सोडण्याभोवती फिरत असतात. म्हणजे शिवसैनिक नसलेल्याना देखील असं वाटत राहतं की राज ठाकरेंच्या व्यक्तिमत्वात शिवसेना नावाचा अंगार पुढे नेण्याची ताकद होती. मराठ्यांचं साम्राज्य हे पार अफगाणिस्तान पर्यंत नेऊन टेकवणाऱ्या, आणि स्वातंत्र्य चळवळ...